Saturday, July 19, 2014

सावधान! त्रास दिल्यास कावळा घेतो बदला Alert - Crow takes revenge

सावधान! त्रास दिल्यास कावळा घेतो बदला


मारुती चितमपल्ली यांची माहिती

crow
'चिऊ आणि काऊ हे दोन पक्षी अगदी लहानपणापासूनच आपल्याला फ्रेण्डली असतात, त्यांची भीती वाटत नाही. चिऊचं ठीक आहे पण काऊला जर का तुम्ही त्रास दिला तर तो बदला घेतो. औरंगाबाद येथील एका व्यक्तीने कावळ्याचे घर तोडले होते, दुखावलेल्या कावळ्याने शंभर मित्रांना बोलावून आणले आणि त्या व्यक्तीला यमसदनी पाठवले', अशी धक्कादायक आठवण ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांनी सांगितली.

रान सोडून मनुष्याच्या सहवासाला येऊन राहिलेले जे प्राणी आहेत, त्यांपैकीच कावळा हा एक! मनुष्याचा तो कायमचा सोबती झालेला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसाबरोबरच त्याचे सगळे व्यवहार चालू असतात. त्याला इजा पोहचविल्यास तो ते लक्षात ठेवतो आणि बदला घेतो. कावळा हा परिपूर्ण पक्षी असून तो सहज कुणावरही हल्ला करत नाही. राजू मेश्राम यांनी अनावधानाने कावळ्याला इजा पोहोचवली असेल, अशी शक्यता चितमपल्ली यांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुलेनगर येथे राहणाऱ्या राजू मेश्राम यांचे गेल्या १९ दिवसांपासून बाहेर पडणेच बंद झाले आहे. त्याचे कारण आहेत दोन कावळे. घराबाहेर येताच हे दोन्ही कावळे त्यांना चोची मारतात. असे आपल्यासोबतच का होत आहे, या प्रश्नाने राजू यांना भांबावून सोडले. कावळ्यापासून सुटका व्हावी, यासाठी राजू यांनी ज्योतिषाचीही मदत घेतली. राजूचे पूर्वजच राजूला त्रास देत आहेत, अशा एकाहून एक चर्चा आता राजू यांच्या कानावर घोंगावू लागल्या आहेत. आपल्याला या कावळ्याच्या तावडीतून सोडवा, अशी हाक मारत त्यांनी वनविभागाकडेही तक्रार दाखल केली. मात्र, कावळे त्यांचा पिच्छा सोडायलाच तयार नाहीत. कावळे एखाद्या व्यक्तीच्या मागे लागल्याचा प्रसंग हा काही आजचाच नसल्याचे चितमपल्ली यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. यापूर्वीही असे प्रसंग घडले आहेत. कावळ्याचे येणे आणि हल्ला करणे म्हणजे पूर्वज येतात, ही अंधश्रद्धा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'ती' घटना आजही लक्षात...

औरंगाबादची घटना खूप वर्षांपू

सावधान! त्रास दिल्यास कावळा घेतो बदला


मारुती चितमपल्ली यांची माहिती


'चिऊ आणि काऊ हे दोन पक्षी अगदी लहानपणापासूनच आपल्याला फ्रेण्डली असतात, त्यांची भीती वाटत नाही. चिऊचं ठीक आहे पण काऊला जर का तुम्ही त्रास दिला तर तो बदला घेतो. औरंगाबाद येथील एका व्यक्तीने कावळ्याचे घर तोडले होते, दुखावलेल्या कावळ्याने शंभर मित्रांना बोलावून आणले आणि त्या व्यक्तीला यमसदनी पाठवले', अशी धक्कादायक आठवण ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांनी सांगितली.

रान सोडून मनुष्याच्या सहवासाला येऊन राहिलेले जे प्राणी आहेत, त्यांपैकीच कावळा हा एक! मनुष्याचा तो कायमचा सोबती झालेला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसाबरोबरच त्याचे सगळे व्यवहार चालू असतात. त्याला इजा पोहचविल्यास तो ते लक्षात ठेवतो आणि बदला घेतो. कावळा हा परिपूर्ण पक्षी असून तो सहज कुणावरही हल्ला करत नाही. राजू मेश्राम यांनी अनावधानाने कावळ्याला इजा पोहोचवली असेल, अशी शक्यता चितमपल्ली यांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुलेनगर येथे राहणाऱ्या राजू मेश्राम यांचे गेल्या १९ दिवसांपासून बाहेर पडणेच बंद झाले आहे. त्याचे कारण आहेत दोन कावळे. घराबाहेर येताच हे दोन्ही कावळे त्यांना चोची मारतात. असे आपल्यासोबतच का होत आहे, या प्रश्नाने राजू यांना भांबावून सोडले. कावळ्यापासून सुटका व्हावी, यासाठी राजू यांनी ज्योतिषाचीही मदत घेतली. राजूचे पूर्वजच राजूला त्रास देत आहेत, अशा एकाहून एक चर्चा आता राजू यांच्या कानावर घोंगावू लागल्या आहेत. आपल्याला या कावळ्याच्या तावडीतून सोडवा, अशी हाक मारत त्यांनी वनविभागाकडेही तक्रार दाखल केली. मात्र, कावळे त्यांचा पिच्छा सोडायलाच तयार नाहीत. कावळे एखाद्या व्यक्तीच्या मागे लागल्याचा प्रसंग हा काही आजचाच नसल्याचे चितमपल्ली यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. यापूर्वीही असे प्रसंग घडले आहेत. कावळ्याचे येणे आणि हल्ला करणे म्हणजे पूर्वज येतात, ही अंधश्रद्धा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'ती' घटना आजही लक्षात...

औरंगाबादची घटना खूप वर्षांपूर्वीची. वर्ष काही नीट आठवत नाही. मात्र, कावळ्याचे घरटे तोडले म्हणून औरंगाबादमधील एका व्यक्तीला कावळ्यांनी जिवानिशी मारले होते, असे चितमपल्ली यांनी सांगितले. कावळ्याचे घरटे तोडल्याने एका कावळ्याने इतर अनेक कावळ्यांना बोलावून आणले. सुमारे १०० कावळे त्या व्यक्तीला मारण्यासाठी जमले होते. त्या व्यक्तीला जिवानिशी मारल्यानंतरही कावळे चोचीने त्याला टोचतच होते, असे चितमपल्ली यांनी सांगितले.

निसर्गात ढवळाढवळ करणे घातक!

खारूताईची लगबग, चिमण्यांची चिवचिव आणि कावळ्याची नजर असे शब्दप्रयोग म्हणूनच प्रचलित झाले आहेत. आपला बचाव करण्यासाठी सर्वच पक्षी प्रतिकार करतात. मात्र, इजा पोहचविल्यानंतर लक्षात ठेऊन बदला घेतो तो कावळा. कावळ्याचे हेच वैशिष्ट्य आहे. निसर्गात माणसाने ढवळाढवळ केल्यास त्याचे दुष्परिणाम समोर येतीलच. घुबड या पक्ष्याने माझ्यावरही हल्ला चढविला होता, अशी आठवण चितमपल्ली यांनी सांगितली. नांदेड जिल्ह्यातील जंगलात प्रवास करीत असताना पैनगंगा नदीच्या काठावर १० फूट अंतरावर घुबडाचे घरटे होते. भीतीपोटी त्या घुबडाने माझ्या डोक्यावरील हॅट नदीत पाडली होती, अशी आठवण चितमपल्ली यांनी सांगितली. एका बिटीश फोटोग्राफरचाही घुबडाने डोळा फोडला होता, असे त्यांनी सांगितले.

नीरीतील तज्ज्ञांशी चर्चा करू : डॉ. वटे
कावळा हल्ला करतो, ही नक्कीच आश्चर्याची बाब आहे. मात्र, यात पूर्वज वगैरे असे काही नाही. या घटनेबाबात मी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (नीरी) तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचे नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांनी सांगितले. आपल्या परिसरात कावळ्याचे घरटे आहे का, याची माहिती राजू मेश्राम यांनी घ्यावी. त्यांनी केस कापावे, दाढी करावी. कावळ्याच्या लक्षात येणार नाही, यासाठी त्यांनी आपले रूपच बदलावे, असा सल्लाही डॉ. वटे यांनी दिला.र्वीची. वर्ष काही नीट आठवत नाही. मात्र, कावळ्याचे घरटे तोडले म्हणून औरंगाबादमधील एका व्यक्तीला कावळ्यांनी जिवानिशी मारले होते, असे चितमपल्ली यांनी सांगितले. कावळ्याचे घरटे तोडल्याने एका कावळ्याने इतर अनेक कावळ्यांना बोलावून आणले. सुमारे १०० कावळे त्या व्यक्तीला मारण्यासाठी जमले होते. त्या व्यक्तीला जिवानिशी मारल्यानंतरही कावळे चोचीने त्याला टोचतच होते, असे चितमपल्ली यांनी सांगितले.

निसर्गात ढवळाढवळ करणे घातक!

खारूताईची लगबग, चिमण्यांची चिवचिव आणि कावळ्याची नजर असे शब्दप्रयोग म्हणूनच प्रचलित झाले आहेत. आपला बचाव करण्यासाठी सर्वच पक्षी प्रतिकार करतात. मात्र, इजा पोहचविल्यानंतर लक्षात ठेऊन बदला घेतो तो कावळा. कावळ्याचे हेच वैशिष्ट्य आहे. निसर्गात माणसाने ढवळाढवळ केल्यास त्याचे दुष्परिणाम समोर येतीलच. घुबड या पक्ष्याने माझ्यावरही हल्ला चढविला होता, अशी आठवण चितमपल्ली यांनी सांगितली. नांदेड जिल्ह्यातील जंगलात प्रवास करीत असताना पैनगंगा नदीच्या काठावर १० फूट अंतरावर घुबडाचे घरटे होते. भीतीपोटी त्या घुबडाने माझ्या डोक्यावरील हॅट नदीत पाडली होती, अशी आठवण चितमपल्ली यांनी सांगितली. एका बिटीश फोटोग्राफरचाही घुबडाने डोळा फोडला होता, असे त्यांनी सांगितले.

नीरीतील तज्ज्ञांशी चर्चा करू : डॉ. वटे

कावळा हल्ला करतो, ही नक्कीच आश्चर्याची बाब आहे. मात्र, यात पूर्वज वगैरे असे काही नाही. या घटनेबाबात मी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (नीरी) तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचे नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांनी सांगितले. आपल्या परिसरात कावळ्याचे घरटे आहे का, याची माहिती राजू मेश्राम यांनी घ्यावी. त्यांनी केस कापावे, दाढी करावी. कावळ्याच्या लक्षात येणार नाही, यासाठी त्यांनी आपले रूपच बदलावे, असा सल्लाही डॉ. वटे यांनी दिला.

No comments:

Post a Comment