पानिपत युद्धाची पार्श्वभूमी
पानिपत युद्धाची पार्श्वभूमी
डॉ.निनाद बेडेकर
असा तह करून वजीर सफदरजंग मराठ्यांना घेऊन दिल्लीला निघाला. त्याआधी अब्दालीने दिल्लीला पाठविलेला वकील कलंदरखानाने बादशाहावर दबाव टाकून त्याच्याकडून अब्दालीच्या सिंधबद्दलच्या मागण्या मंजूर करून घेतल्या होत्या. अब्दाली परत गेला. त्यामुळे मराठ्यांच्या मदतीची गरज उरली नव्हती. जावेदखानाने ही बातमी वजीर सफदरजंगाला सांगितल्यावर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने बादशाहाला साफ सांगितले की, तुम्ही अब्दालीबरोबर केलेला करार मला मान्य नाही. मराठी फौजा दिल्लीत आल्यामुळे दिल्ली आणि भोवताली त्यांचा उपसर्ग लागला. बादशाहाचा सल्लागार जावेदखान मराठी फौजा दिल्लीबाहेर काढायच्या तयारीला लागला. बादशाही खजिन्यातून काही पैसे हाती लागल्यावर मराठ्यांनी दिल्ली सोडली. पण या प्रकारामुळे बादशाह आणि वजीर यांच्यात मोठी तेढ निर्माण झाली.
वजिराचे कारस्थान
इ.सन 1753 च्या सुरुवातीला अब्दालीने आपला मोर्चा परत दिल्लीकडे वळवला. त्याचा वकील दिल्लीत येऊन 50 लक्ष रुपये मागत होता. वजिराने त्याची समजूत घालून त्याला परत पाठवले. वजिराने बादशाहाला मराठ्यांची मदत घेऊन अब्दालीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले. पण बादशाह आणि वजिरामधली तेढ वाढतच गेली.
चौथाई गोळा करण्यासाठी इ.सन 1754 सुरुवातीला मराठ्यांनी कुम्हेरीच्या किल्ल्यावर मोर्चे लावले. किल्ल्यावर सूरजमल जाट होता. तो चाळीस लाख रुपयांची खंडणी देण्यास तयार होता. पण मराठे एक कोटी रुपये मागत होते. शेवटी किल्ला ताब्यात येत नाही हे पाहिल्यावर मराठ्यांनी तीन हफ्ते मिळून एकूण तीस लाख रुपयांची खंडणी कबूल केली. रघुनाथराव यावेळी दिल्लीच्या बादशाहाकडे रकमेसाठी तगादे लावत होताच.
इ.सन 1756 मध्ये होळकर हे सावनुरावर आणि शिंदे मारवाडच्या स्वारीत गुंतलेले असल्याने अब्दाली परत दिल्लीवर चालून आला. अंताजी माणकेश्वर हा एक मराठी सरदार दिल्लीत होता. पण त्याची फौज कमी होती. 14 जानेवारीला अब्दालीच्या वकिलाने दिल्लीकडे दोन कोटी रुपये आणि सरहिंदपर्यंतचा प्रदेश मागितला. ही मागणी ऐकून सर्वच हतबुद्ध झाले. अब्दालीने मुघलांच्या बेगमेला हाताशी धरून दिल्लीची माहिती काढली. अब्दालीने यावेळी दिल्ली लुटून मोठी दौलत मिळविली. अमिरांच्या हवेल्या लुटल्या. हत्ती, घोडे लुटले. ही सारी दौलत त्याने त्याचा मुलगा तैमूरशाह याच्याबरोबर लाहोरला पाठवली. पुढे अब्दाली मथुरेत आला. मथुरा लुटली. गोसाव्यांची मोठी कत्तल केली. गाईंची आणि माणसांची मुंडकी एकमेकांच्या तोंडाला लावून झाडावर टांगली. अनन्वित अत्याचार केले. अटकेपासून पार आग्य"ापर्यंतचा प्रदेश पार बेचिराख करून टाकला. त्याचा वजीर शाहवलीखान, नजीबखान रोहिला, शाहवलीउल्ला या सर्वांनी मिळून दिल्ली-मथुरेत हैदोस घातला. हिंदू स्त्रियांना पळवून नेले. मूर्ती फोडल्या, घरे जाळली, मोठा हलकल्लोळ केला आणि अब्दाली अफगाणिस्तानात निघून गेला.
युद्धाच्या तोंडावर
मराठे आता पंजाब पार करून अटकेवर निघाले. 8 मार्च 1758 ला मराठी फौजा सरहिंदला आल्या. एप्रिलमध्ये लाहोर जिंकले. चिनाब नदीचे पाणी गहिरे आणि गार असल्याने मराठी फौजेला चिनाब उतरण्यास वेळ लागला. शेवटी ऑगस्ट महिन्यात मराठी फौज सिंधू नदी ओलांडून अटकेवर आली. शिंद्यांना बंदोबस्तासाठी ठेवून रघुनाथराव परतला.
नजीबखान रोहिल्याने अब्दालीकडे मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी लकडा लावला. दत्ताजी पंजाबात पहारे कायम करून शूकरतालला गंगेच्या काठावर आला. पण अब्दालीने पंजाबातील शिंदे यांचे पहारे उडवले आणि तो दिल्लीकडे सरकू लागला. ते पाहिल्यावर दत्ताजी शिंदे यमुना ओलांडून तिच्या पश्चिम तीरावर आला. बुराडी घाट, जगत्पूर, मजनूका टीला, गौरीपूर, सनावली, अंधेरा येथे त्याने तीरावर आणि उतारावर पहारे ठेवले. पण अब्दाली बुढियाहून यमुना ओलांडून अंतर्वेदीत आला. तो यमुनेच्या पूर्व तीरावर येऊन थांबला. शिंद्यांच्या लोकांनी तोंडे वळवली आणि यमुनेच्या पश्चिम तीरावरून ते पूर्वेकडे पाहू लागले.
10 जानेवारी 1760 या दिवशी अचानक अब्दालीने चार ठिकाणाहून यमुना ओलांडली आणि तो पश्चिम तीरावर आला. तेव्हा झालेल्या लढाईत बयाजी शिंदे, दत्ताजी शिंदे हे पडले. शिंद्यांचा गोट पार लुटला गेला. नजीबखान रोहिल्याच्या सांगण्यावरून अब्दाली परत गेला नाही तो दुआबातच राहिला. पानिपतची ही नांदीच होती.
Purchase Panipat book here
डॉ.निनाद बेडेकर
असा तह करून वजीर सफदरजंग मराठ्यांना घेऊन दिल्लीला निघाला. त्याआधी अब्दालीने दिल्लीला पाठविलेला वकील कलंदरखानाने बादशाहावर दबाव टाकून त्याच्याकडून अब्दालीच्या सिंधबद्दलच्या मागण्या मंजूर करून घेतल्या होत्या. अब्दाली परत गेला. त्यामुळे मराठ्यांच्या मदतीची गरज उरली नव्हती. जावेदखानाने ही बातमी वजीर सफदरजंगाला सांगितल्यावर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने बादशाहाला साफ सांगितले की, तुम्ही अब्दालीबरोबर केलेला करार मला मान्य नाही. मराठी फौजा दिल्लीत आल्यामुळे दिल्ली आणि भोवताली त्यांचा उपसर्ग लागला. बादशाहाचा सल्लागार जावेदखान मराठी फौजा दिल्लीबाहेर काढायच्या तयारीला लागला. बादशाही खजिन्यातून काही पैसे हाती लागल्यावर मराठ्यांनी दिल्ली सोडली. पण या प्रकारामुळे बादशाह आणि वजीर यांच्यात मोठी तेढ निर्माण झाली.
वजिराचे कारस्थान
इ.सन 1753 च्या सुरुवातीला अब्दालीने आपला मोर्चा परत दिल्लीकडे वळवला. त्याचा वकील दिल्लीत येऊन 50 लक्ष रुपये मागत होता. वजिराने त्याची समजूत घालून त्याला परत पाठवले. वजिराने बादशाहाला मराठ्यांची मदत घेऊन अब्दालीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले. पण बादशाह आणि वजिरामधली तेढ वाढतच गेली.
चौथाई गोळा करण्यासाठी इ.सन 1754 सुरुवातीला मराठ्यांनी कुम्हेरीच्या किल्ल्यावर मोर्चे लावले. किल्ल्यावर सूरजमल जाट होता. तो चाळीस लाख रुपयांची खंडणी देण्यास तयार होता. पण मराठे एक कोटी रुपये मागत होते. शेवटी किल्ला ताब्यात येत नाही हे पाहिल्यावर मराठ्यांनी तीन हफ्ते मिळून एकूण तीस लाख रुपयांची खंडणी कबूल केली. रघुनाथराव यावेळी दिल्लीच्या बादशाहाकडे रकमेसाठी तगादे लावत होताच.
इ.सन 1756 मध्ये होळकर हे सावनुरावर आणि शिंदे मारवाडच्या स्वारीत गुंतलेले असल्याने अब्दाली परत दिल्लीवर चालून आला. अंताजी माणकेश्वर हा एक मराठी सरदार दिल्लीत होता. पण त्याची फौज कमी होती. 14 जानेवारीला अब्दालीच्या वकिलाने दिल्लीकडे दोन कोटी रुपये आणि सरहिंदपर्यंतचा प्रदेश मागितला. ही मागणी ऐकून सर्वच हतबुद्ध झाले. अब्दालीने मुघलांच्या बेगमेला हाताशी धरून दिल्लीची माहिती काढली. अब्दालीने यावेळी दिल्ली लुटून मोठी दौलत मिळविली. अमिरांच्या हवेल्या लुटल्या. हत्ती, घोडे लुटले. ही सारी दौलत त्याने त्याचा मुलगा तैमूरशाह याच्याबरोबर लाहोरला पाठवली. पुढे अब्दाली मथुरेत आला. मथुरा लुटली. गोसाव्यांची मोठी कत्तल केली. गाईंची आणि माणसांची मुंडकी एकमेकांच्या तोंडाला लावून झाडावर टांगली. अनन्वित अत्याचार केले. अटकेपासून पार आग्य"ापर्यंतचा प्रदेश पार बेचिराख करून टाकला. त्याचा वजीर शाहवलीखान, नजीबखान रोहिला, शाहवलीउल्ला या सर्वांनी मिळून दिल्ली-मथुरेत हैदोस घातला. हिंदू स्त्रियांना पळवून नेले. मूर्ती फोडल्या, घरे जाळली, मोठा हलकल्लोळ केला आणि अब्दाली अफगाणिस्तानात निघून गेला.
युद्धाच्या तोंडावर
मराठे आता पंजाब पार करून अटकेवर निघाले. 8 मार्च 1758 ला मराठी फौजा सरहिंदला आल्या. एप्रिलमध्ये लाहोर जिंकले. चिनाब नदीचे पाणी गहिरे आणि गार असल्याने मराठी फौजेला चिनाब उतरण्यास वेळ लागला. शेवटी ऑगस्ट महिन्यात मराठी फौज सिंधू नदी ओलांडून अटकेवर आली. शिंद्यांना बंदोबस्तासाठी ठेवून रघुनाथराव परतला.
नजीबखान रोहिल्याने अब्दालीकडे मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी लकडा लावला. दत्ताजी पंजाबात पहारे कायम करून शूकरतालला गंगेच्या काठावर आला. पण अब्दालीने पंजाबातील शिंदे यांचे पहारे उडवले आणि तो दिल्लीकडे सरकू लागला. ते पाहिल्यावर दत्ताजी शिंदे यमुना ओलांडून तिच्या पश्चिम तीरावर आला. बुराडी घाट, जगत्पूर, मजनूका टीला, गौरीपूर, सनावली, अंधेरा येथे त्याने तीरावर आणि उतारावर पहारे ठेवले. पण अब्दाली बुढियाहून यमुना ओलांडून अंतर्वेदीत आला. तो यमुनेच्या पूर्व तीरावर येऊन थांबला. शिंद्यांच्या लोकांनी तोंडे वळवली आणि यमुनेच्या पश्चिम तीरावरून ते पूर्वेकडे पाहू लागले.
10 जानेवारी 1760 या दिवशी अचानक अब्दालीने चार ठिकाणाहून यमुना ओलांडली आणि तो पश्चिम तीरावर आला. तेव्हा झालेल्या लढाईत बयाजी शिंदे, दत्ताजी शिंदे हे पडले. शिंद्यांचा गोट पार लुटला गेला. नजीबखान रोहिल्याच्या सांगण्यावरून अब्दाली परत गेला नाही तो दुआबातच राहिला. पानिपतची ही नांदीच होती.
Purchase Panipat book here
No comments:
Post a Comment